साहित्य हे समाज प्रबोधनाचे माध्यम – श्री सुरज गोळे

अकोला (बबनराव वि.आराख):
कवितेच्या माध्यमातून समाजातील विविध विषय मांडता येतात व समाज प्रबोधन होते, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी तथा अकोला आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी श्री. सुरज गोळे यांनी अंकुर साहित्य संघ व उषाताई घुगे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कौलखेड येथील गणेश गार्डन सभागृहात पार पडलेल्या स्वर्गीय उषाताई घुगे स्मृतीप्रीत्यर्थ काव्य स्पर्धेचा निकाल व कवी संमेलन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.

यावेळी अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्री. वासुदेवाराव खोपडे, अतिथी म्हणून माजी नगरसेवक गजानन गवई, नगरसेवीका योगीता पावसाळे, समिक्षक डॉ. विनय दांदळे आदी विचार मंच्यावर उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. तुळशीरामजी बोबडे यांनी केले.

दरम्यान
स्वर्गीय उषाताई घुगे स्मृतीप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या सुमारे दिडशे वर कवितांचे परिक्षण प्रसिद्ध साहित्यिक समीक्षक डॉ. विनय दांदळे यांनी केले. यामध्ये ब्रम्हपुरी (चंद्रपूर) येथील रोशन पीलवान प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले, तर व्दितीय क्रमांक नाशिक येथील सौ. अलका कोठवदे आणि तृतीय क्रमांक सौ. सारिका अयाचित यांना मिळाला. तर उत्तेजनार्थ पूरस्कार राहुल भगत,‌ सौ. प्रिया भोंडे, प्रकाश डोबाळे, श्री. कृष्णराव घाडगे, सुमेध वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक विजेत्या कवींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी श्री. गजानन छबीले यांनी केले, तर आभार कवी श्री. सुनिल लव्हाळे यांनी मानले. कवी संमेलन अध्यक्षस्थानी डॉ. अशोक सिरसाठ, तर प्रमुख पाहुणे प्रा. विठोबा गवई, कवी पत्रकार देवानंद गहीले, उमा गंवई विचार मंचावर उपस्थित होते. श्री सुरज गोळे, श्री. हिम्मत ढाळे, सौ सारिका अयाचित, राहूल भगत, प्रा. संजय कावरे. नारायण अंधारे, नयनाताई देशमुख, प्रा. मोहन काळे, गोदावरी कलोरे, तारा अस्वारे, डॉ. विनय दांदळे, सुनील लव्हाळे,भारत ईंगोले अमोल गोंडचवर, सुमेध वानखेड़े, वासुदेवराव खोपडे तसेच मंचावरील मान्यवरांनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धिरज चावरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मनोहर घुगे आणि कवी सुनील लव्हाळे यांनी व्यक्त केले.