मुंबई: माहीमच्या काशी विश्वेश्वर मंदिरात कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी असंख्य भाविकानी साकडे घालून आणि अखंड नामस्मरण करून प्रार्थना केली. असंख्य भाविकांनी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केलेल्या ओम नमः शिवाय अखंड नामस्मरणाची हाक काशी विश्वेश्वराने ऐकली आणि काशी विश्वेश्वराच्या कृपेने कुलभूषण जाधव यांच्याबाजून १५ – १ मतांनी निकाल भारताच्या बाजूने लागला. अशा प्रकारे सध्या भाविकांमध्ये परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी भारताच्या सत्याचा विजय आणि पाकिस्तानच्या निचतेचा पराजय झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने निरपराध कुलभूषण जाधव यांच्यावर लावलेले सर्व खोटे आरोप फेटाळून लावले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन काशीविश्वेश्वर मंदिर, स्थानिक समाजसेवक श्री. खातू आणि ज्ञानदा प्रबोधन संस्था व राष्ट्राभिमानी समितीने केले होते.
]]>
Related Posts

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम !
मुंबई प्रतिनिधी: मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या…